जामखेड – लोकांनी गेल्या अडीच तीन वर्षात अनूभवल आहे, आपला आणि बाहेचा काय असतो ते. तालुक्यात जिरवाजिरवीचे नाही तर विकासाचे राजकारण करायचे असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले.
चोंडी येथे आ. शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जामखेडसह कर्जत तालुक्यातील नवनिर्वाचित 10 सरपंच आणि 86 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, काकासाहेब धांडे, अशोक खेडकर, सोमनाथ पाचारणे, जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशीद, कर्जतचे तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख बळीराम यादव उपस्थित होते.
आ शिंदे म्हणाले, कर्जत जामखेड तालुक्यातील अकरा पैकी आठ ग्रामपंचायतीत भाजपा आणि मित्र पक्षाला लोकांनी बहुमताने संधी दिल्याने लोकांचा कौल स्पष्ट झाला आहे. कर्जत तालुक्यातील निंबे ग्रामपंचायतीचे सरपंचपद केवळ पाच मतांनी विरोधकांच्या ताब्यात गेले आहे. मात्र तेथेही पाच ग्रामपंचायत सदस्य भाजपचे असल्याने आपले बहुमत आहे.