मुंबई – भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून सध्या जे काही सुरू आहे ते वर्तमानपत्रातून वाचल्यावर असे लक्षात येते की, विराट कोहलीच्या विरोधात खूप घाणेरडे राजकारण सुरू आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचा क्रिकेटपटू सलमान बट याने केले आहे.
दुसरीकडे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कोहलीच्या जागी मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवले जाणार असल्याचा वृत्ताचा बीसीसीआयने फेटाळले आहे. भारतीय संघात दोन कर्णधार असल्याचे बोलले जात होते.
कोहलीसह विनाकारण रोहितचे नाव घेत या दोन्ही खेळाडूंमध्ये तिढा निर्माण करण्याचे राजकारण सध्या खेळले जात आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक सामने व स्पर्धा जिंकल्या आहेत. हे सगळे असूनही कोहलीला खाली खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही बटने सांगितले.