मंचर – रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व भौतिक विकासामध्ये शरद पवार यांचे योगदान अवर्णनीय असून बदलत्या सामाजिक परिस्थितीत राजकीय व्यक्तींनी जाहीर व्यासपीठावरून बोलताना भान ठेवले पाहिजे. यासाठी शरद पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग व रयत शैक्षणिक संकुल मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त व रयत शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी योगदाननिमित्त अभीष्टचिंतन व रयत कृतज्ञता सोहळा शरद रयत चषक राज्यस्तरीय महाविद्यालयीन ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ पार पडला.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अध्यक्ष ऍड. राम कांडगे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील,
प्रा. राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, संजय बाणखेले, बाळासाहेब पिंगळे, प्राचार्य के. जी. कानडे, प्राचार्य उत्तम आवारी, प्रा. डॉ. नानासाहेब गायकवाड, ऍड. बाळासाहेब पोखरकर, गुलाबराव वळसे पाटील, प्रा. डॉ. के. बी. जगदाळे,प्रा. डॉ. ए. डी. आंधळे, चंद्रकांत वाव्हळ, किसन रत्नपारखी, एस. टी. पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी प्रास्ताविक, केशव टेमकर यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य उत्तम आवारी यांनी आभार मानले. दिलीप चौधरी, संतोष मुंढे, बाळकृष्ण केदारी, दत्तात्रय खोरे, सोनाली सोनवणे, सुवर्णा गोसावी, अनिता चव्हाण, कल्याणी बांगर, उज्ज्वला बाणखेलेज कैलास एरंडे, बाळासाहेब गार्डी यांनी नियोजन केले. यावेळी रयत सेवक उपस्थित होते.