नागपूर – महिला बचत गटांच्या महिला सदस्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी “हनुमान चालीसा’ म्हणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर जात असताना नागपूर पोलिसांनी आंदोलकांना रोखले. वर्ध्यातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी फडणवीस यांचे मूळ गाव असलेल्या नागपूर शहरात आठवडाभरापासून निदर्शने केली असून, राज्य सरकारने मानधन रोखले आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
रविवारी त्यांनी निषेधाची हाक दिल्यानंतर, नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या कार्यालयात शहर पोलिसांनी सुरक्षा वाढवली. निहाल पांडे यांनी आंदोलकांचे प्रतिनिधित्व करताना सांगितले की, त्यांनी त्यांच्या मागणीसाठी फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळील संविधान चौक ते त्रिकोणी पार्कपर्यंत रॅली काढण्याची योजना आखली होती.
या महिलांना मानधनाशिवाय जगणे कठीण झाले आहे. आठवडाभरापासून आंदोलन करूनही फडणवीस आंदोलकांची भेट घेत नाहीत, असा दावा त्यांनी केला. आंदोलक उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे कूच करू लागले तेव्हा त्यांना रोखण्यात आले, असे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.