Police Bharti Paper । उत्तर प्रदेश पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका फूटण्याच्या प्रकरणात आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी ही भरती परीक्षा झाली होती. त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटल्याचा गदारोळ सुरू झाला होता.
अगोदर ही केवळ अफवा असल्याचे सांगत ही बाब फेटाळून लावण्यात आली होती. मात्र अनेक जण पेपर लीक झाले असल्याचा दावा करत पुढे आल्यानंतर अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
यासंदर्भात अनेक नागरिकांनी पेपर फूटल्याचे पुरावे सोशल मीडियावरही टाकले होते. दुसऱ्यांदा परीक्षा घेतली जावी अशी मागणी करत निदर्शनेही करण्यात आली. । Police Bharti Paper
योगी सरकारने कठोर भूमिका घेत अखेर परीश रद्द केली आणि परीक्षा प्रक्रियेची थट्टा करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर केले.
येत्या सहा महिन्यांत नव्याने परीक्षा घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या घोटाळ्यातील आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, प्रवेश पत्र, कोरे धनादेश, मोबाइल आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तीन जण देवरियाचे आहेत तर एक जण प. बंगालच्या हावडा जिल्ह्यातील आहे. उत्तर प्रदेश भरतीची परीक्षा २२ केंद्रांवर झाली होती. परीक्षेच्या दरम्यानही काही केंद्रांवर मध्यस्थांना पकडण्यात आले आहे. । Police Bharti Paper