पुणे : कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना दुपारच्या माध्यन्ह शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली आहे. सुमारे 20 ते 25 मुलांना ही विषबाधा झाली आहे. दरम्यान, आहार खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि इतर त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीनं भारती हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या शाळेला सेंट्रल किचनच्या द्वारे भोजन पुरविले जाते.