आळंदी – केळगाव, चऱ्होली ग्रामपंचायत व आळंदी नगरपरिषद माझी वसुंधरा स्वच्छता अभियान अंतर्गत आळंदी स्वच्छता जनजागृती मोहीम अभियान विविध सेवाभावी संस्था यांचे सहकार्याने राबविण्यात आले. आळंदी चाकण रोड, बाह्यवळण मार्गावर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मणराव हाके यांचे हस्ते वृक्षारोपण व जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या प्रसंगी आळंदी स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर, महा. राज्य यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णु कुऱ्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर, ज्ञानेश्वर घुंडरे-पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, ज्ञानाई ग्रुपचे हरिभाऊ कुऱ्हाडे, शुभम पाटील, बाळासाहेब कवळासे, सिद्धेश्वर सलगर, योगेश धोतरे, माऊली बुधवंत, एकनाथ मस्के, नवनाथ गयाळ, गणेश गलांडे, गणेश काळे, अशोक गरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील बाह्यवळण मार्गावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी औद्योगिक वसाहतीतील मे. डायनॅक्सेल इंजिनियर्स प्रा.ली. मरकळचे संचालक संदिप देवरे यांनी सामाजिक बांधिलकीतून या परिसरात वृक्ष लावण्यास वृक्षरोपे उपलब्द्ध करून दिली.
यात पंगारा, फणस, कैलासपती, पुत्रजजीवी, सोनचाफा, बेल, आंबा, रुद्राक्ष, सिंगापुरी चेरी, त्रकुळ या वृक्ष रोपांचा समावेश आहे. तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.