पिंपरी – अहिंसा या मुल्याचा सर्वप्रथम उद्घोष भगवान महावीर यांनी केला. त्यांच्या या मुल्याचा प्रभाव महात्मा गांधी, बर्नार्ड शॉ, नेल्सन मंडेला या महापुरुषांवर पडला होता. त्यामुळेच भगवान महावीर यांना अहिंसेचे अवतार म्हणतात, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नुकतेच अहिंसा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी पवार बोलत होते. उल्हास पवार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, शाकाहार प्रचारक सावित्री भोसले यांचा अहिंसा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी पल्लवी जैन, यश मुथा यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला बधाई म्यूजिकल ग्रुपचा भक्तिगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. भक्ती गीत स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भक्तीगीत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम : पार्श्वनाथ युवक मंडळ, द्वितीय : नवकार बहु मंडळ (भोसरी), तृतीय : दिगंबर जैन एकता मंडळ. उत्तेजनार्थ : सरगम महिला मंडळ (चिंचवडगाव), प्रकाश मुनोत-राहुल पारस ग्रुप (आकुर्डी), चिंतामणी महिला मंडळ, पारस भवन (चिंचवड), उद्योगनगर मैना सुंदरी महिला मंडळ (निगडी).