पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिसने जीता सब कर्मों को, जग को ऐसा अतिवीर चाहिए, त्रिशला के सुत जैसा हमें वीर चाहिए, घर घर में ऐसा महावीर चाहिए, अशा हिंदी गीताचे प्रकाशन मुनीश्री प्रणाम सागर महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या गीताची प्रस्तुती आणि संकल्पना उदय गाडगीळ यांची असून, संगीतकार आणि पार्श्वगायक हर्षित अभिराज यांनी हे गीत संगीतबद्ध करून गायले आहे.
संपूर्ण जगाला अहिंसेच्या परममंत्राचा उपदेश देणारे भगवान महावीर यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या कार्याचा आलेख चढता आहे. आताच्या काळात प्रत्येक घरात भगवान महावीर यांच्या जगा आणि जगू द्या, उत्तम क्षमा, अपरिग्रह, हे संदेश उराशी बाळगून समाजाच्या कल्याणासाठी झटणार्या पिढीची गरज आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण तारेवरची कसरत करताना दिसत आहे, असे मत मुनीश्री प्रणामसागर महाराज यांनी व्यक्त केले.
या वेळी भगवान महावीर ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, प्रकाश शेडबाळे, वीरेंद्र जैन, सुरेगोंडा पाटील, तसेच संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गीताचे संगीत संयोजन हर्षित यांच्यासह शैलेश येवले आणि सचिन अवघडे यांनी केले असून, उदय गाडगीळ, शैलेश भावसार, अवंतिका मंडलिक, सुवर्णा कोळी, जया पवार, प्रशांत पवार यांनी वृंदगान केले आहे.