जयपुर: राजस्थान सरकारने 1 जून पासून राज्यातील सर्व सरकारी व खासगी कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरू करण्यास अनुमती दिली आहे. तसेच राज्य सरकारने सर्व वाहनांना पुर्ण प्रवासी क्षमतेने चालू करण्यासही अनुमती दिली आहे.
या वाहनांच्या मंजुर क्षमतेनुसार त्यातून प्रवासी नेता येतील पण त्या पेक्षा जास्त प्रवासी नेता येणार नाहीत. त्या सरकारने सर्व बस वाहतूकही खुली केली आहे. मात्र त्यातून शहरांतर्गत बस वाहतुक वगळण्यात आली आहे. मालवाहतुकीसाठी आता ई पासची गरज नाही असेही त्या सरकारने नमूद केले आहे.