मुंबई – बॅंकांसंदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे काम कुठल्याही बाहेरच्या संस्थेला दिले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थापासून जनतेने सावध राहावे असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले आहे.
इंटिग्रेटेड ओम्बेस्डम स्कीम 2021 अशा प्रकारची योजना रिझर्व बॅंकेने सुरू केली आहे, अशा प्रकारच्या अफवा समाज माध्यमावर पसरल्या आहेत.
या संदर्भात काही ग्राहकांनी रिझर्व बॅंकेकडे माहिती दिली आहे. मात्र अशा प्रकारची कुठलीही स्कीम रिझर्व बॅंकेने सुरू केलेली नाही असे रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बॅंका संदर्भातील तक्रारी ग्राहकांनी या तिसऱ्या पक्षाकडे कराव्यात, या तक्रारीचे निवारण शुल्कासहित किंवा विनाशुल्क केले जाईल अशा प्रकारच्या अफवा समाजमाध्यम असल्याबद्दल रिझर्व बॅंकेने चिंता व्यक्त केली आहे.
तक्रारीचे निवारण करण्यासाठी रिझर्व बॅंकेची स्वतःची यंत्रणा आहे. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या काही तक्रारी असल्यानंतर रिझर्व बॅंकेच्या या व्यवस्थेकडे दाद मागण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह बॅंकेत कडे कुठल्या व्यवस्थेकडे तक्रार करायची याचा संपूर्ण तपशील रिझर्व बॅंकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.