बीड – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. तर बीड जिल्ह्यातही यावरून मोठा गदारोळ झाला. अखेर करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावर आता माजी मंत्री आणि भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
परळी शहरात झालेल्या सर्व प्रकारामुळे राज्याची मान खाली गेल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं. ‘अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलं.
अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2021
करुणा शर्मा यांनी परळीत जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र परळीत गेल्यावर जातीवाचक शिवीगाळ आणि वाहनात पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या वाहन चालकास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.