गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात एक स्टम्प तोडला. खरेतर ही एक सामान्य घटना आहे हेच प्रेक्षकांना वाटले असेल. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला धावबाद करताना पंड्याने चेंडू फेक थेट स्टम्पवर केली व त्यावेळी या स्टम्पचे दोन तुकडे झाले. पंड्यामुळे बीसीसीआयचे आर्थिक नुकसान झाल्याचे समालोचकांनाही सांगितले मात्र, यामुळे नुकसान नव्हे तर लाभच झाला आहे.
पंड्या 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आयपीएल स्पर्धेत तो परतला व गुजरातचा कर्णधार म्हणून यशस्वीही ठरत आहे. राजस्थानविरुद्धच्या लढतीत त्याने फलंदाजी, गोलंदाजी, नेतृत्व व क्षेत्ररक्षण या चारही क्षेत्रात आपण पूर्ण तंदुरुस्त झाल्याचेच सिद्ध केले व ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज होत असल्याचा संकेत निवड समितीला दिला आहे. आता पंड्याने जो स्टम्प तोडला त्यामुळे बीसीसीआयला जो आर्थिक फटका बसला त्याने थोडी चिंता वाढली असली तरीही पंड्या पूर्ण तंदुरुस्त झाला हे काय कमी नाही. ऑस्ट्रेलियातील एका कंपनीने हे एलइडी स्टम्प तयार केले आहेत.
यापूर्वी याचा वापर ऑस्ट्रेलियातील बीगबॅश लीगमध्ये वापरले गेले व त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यावर आयसीसीने त्याला मान्य करत जगभरातील क्रिकेट मंडळांसह त्याचा वापर मर्यादीत षटकांच्या सामन्यात सुरु केला. या स्टम्पच्या सेटची किंमत तब्बल 45 ते 50 लाख रुपये असते. एका सामन्यासाठी खेळाडूंना जी रक्कम मिळते त्यापेक्षाही ही किंमत जास्त आहे.
पंड्याने स्टम्प तोडला त्याचा फटका बीसीसीआयला बसला मात्र, वाईटातूनही काही चांगले घडले तर त्याचे समाधान वाटते. हेच पंड्यामुळे घडले, आता त्याला नुकसान झाले का लाभच होणार आहे. आता यंदाच्या आयपीएलमध्ये अजून 50 सामने बाकी आहेत, ही घटना पुन्हाही घडू शकते मात्र, त्याकडे नुकसान म्हणून पाहण्यापेक्षा सकारात्मकतेने पाहावे.
काय मोडले ते न पाहता खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे काय जोडले गेले ते पाहावे. हा मोडलेला स्टम्पच पंड्याची बॅट बनून त्याला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी व टीकाकारांची तोंडे बद करण्यासाठी निर्णायक ठरेल.