काश्मिरींसोबत एकता व्यक्त करण्यासाठी खटाटोप
इस्लामाबाद- जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या महिन्यानंतर काश्मिरी जनतेशी एकता व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानने शुक्रवारी काश्मीर अवर पाळला.
दुपारी बाराच्या ठोक्याला देशभरात निषेध मोर्चे काढण्यात आले. त्या पाठोपाठ रहदारी थांबवून सायरन वाजवत निषेध नोंदवण्यात आला. या काश्मीर अवरचा मुख्य कार्यक्रम इस्लामाबाद येथे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत पार पडला. ज्यात इम्रान खानयांनी उपस्थीत जनसमुदायाला उद्देशून भाषन करत झेंडा वंदन देखील केले. ज्यानंतर त्यांनी काश्मीर बाबत घोषणा बाजी करत भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याबद्दल टिका केली.
यावेळी भाषणात इम्रान खान म्हणाले की, आज देश भरातील आणि देशाच्या बाहेरील प्रत्येक पाकिस्तानी नागरीक हा काश्मीरी जनतेच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. आज काश्मीर मधील 80 लाख जनता कठीन अवस्थेतून जात आहे. त्यांना गेल्या चार आठवड्यांपासून बंदीस्त करुन ठेवले आहे. त्यामुळे आपण आज हा काश्मीर अवर पाळत असून पाकिस्तान त्यांच्या सोबत शेवटच्या श्वासा पर्यंत राहिल याची शाश्वती आम्ही त्यांना या विशेष कार्यक्रमाद्वारे देतो आहोत.