जयपूर – राजस्थानमध्ये वऱ्हाडाची कार चंबळ नदीमध्ये कोसळून जागीच दहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे. बरवाडावरून परतत असताना मध्यरात्री कारला अपघात झाला. अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत कार नदीतून बाहेर काढली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात ही दुर्घटना घडली असून या दुर्दैवी घटनेवर त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
कोटा में बारातियों की कार चंबल नदी में गिरने से दूल्हे सहित 9 लोगों की मृत्यु बेहद दुखद व दुर्भाग्यपूर्ण है। कलक्टर से बात कर पूरी घटना की जानकारी ली है। मेरी गहरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं,ईश्वर उन्हें यह आघात सहने की शक्ति दें, दिवंगतों की आत्मा को शांति प्रदान करें।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) February 20, 2022
सदर वऱहाड उज्जैनला जात होते. वऱहाडय़ांची बस पुढे निघून गेली होती आणि नवरदेवाला घेऊन जाणारी कार रस्ता भरकटली होती. याचदरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नदीत कोसळली. यानंतर बचाव पथकाने कार नदीतून बाहेर काढली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाल्याच्या 2 ते 3 तासानंतर बचावकार्यास सुरुवात झाली. मदत व बचावकार्यावेळी घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. कारमधून सात आणि नदीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती कोटाचे पोलीस अधीक्षक केसर सिंह शेखावत यांनी दिली आहे. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. विच्छेदन करून सर्व मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.