मुंबई – आज “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाची चर्चा सुरु होती. अखेर आज या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न झाले. मराठी सिनेसृष्टीतील एका अभनेत्याने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेता अभिजित केळकरने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये अभिजित म्हणतो,”आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…गेली १२ वर्षे”. ही पोस्ट करताना अभिजीतने जास्त काही लिहिलेले नाही परंतु समृद्धी महामार्गाचे आज होणारे लोकार्पण आणि अभिजीतने साधलेले टायमिंग यामुळे आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
View this post on Instagram
या सोबतच अभिनेत्याने वापरलेल्या ईमोजी देखील त्याचा संताप व्यक्त करताहेत. सामाजिक प्रश्नांबाबत अभिजित नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून बोलत व्यक्त होत असतो. आजही केलेल्या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. नाटक,मालिका आणि चित्रपट या तिन्हही फॉरमॅटमध्ये अभिजीतने दमदार अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अभिजीतने व्यक्त केलेल्या या संतापवर आता चाहत्यांनी देखील आपली मत मांडायला सुरुवात केली आहे.