सातारा (प्रतिनिधी)- येथील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज आणि सातारा जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 27 एप्रिल रोजी कॉलेजच्या लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृहात ‘ संवैधानिक मूल्यांच्या विकासामधील भारतीय न्यायव्यवस्थेचे योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे.
परिसंवादात बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन ॲड. जयंत जायभावे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत ॲड. वसंतराव भोसले, रयत संस्थेचे ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कायदा सल्लागार ॲड. दिलावर मुल्ला, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुधाकर आव्हाड, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिसंवादास विधी शाखेतील विद्यार्थी, विधिज्ञ, बार असोसिएशनच्या सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे आणि बार असोसिएशनमार्फत करण्यात आले आहे.