लखनौ – उत्तरप्रदेशात अन्य समविचारी पक्षांबरोबर विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबत आम्ही खुल्या दिलाने विचार करू हा पर्याय आम्ही बंद केलेला नाहीं असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केले आहे.
राज्यातील 403 जागांवर कॉंग्रेस स्वबळावर लढणार की अन्य पक्षांशी आघाडीचा विचार करणार या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. त्या म्हणाल्या की तथापि या विषयी इतक्यात काहीं स्पष्ट करणे योग्य नाही. आम्ही आघाडीचा विचार सोडून दिलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमचे प्रमुख उद्दीष्ठ भाजपला पराभूत करणे हे आहे. त्यामुळे अन्य पक्षांनीही हीच भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली. माझी या बाबतची भूमिका खुल्या स्वरूपाची असली तरी माझा पक्ष हा माझा अग्रक्रम आहे असेहीं प्रियांकांनी स्पष्ट केले.