‘विरोधी पक्ष निवडणुकीत जिंकल्यास ईव्हीम चांगले आणि पराभव झाल्यास वाईट’
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले आहेत. यापूर्वी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला आघाडी मिळणार आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर विरोधकांनी ईव्हीम मध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. विरोधी नेत्यांनी व्हीव्हीपॅट पावती ईव्हीम मशीन सोबतच मोजल्या जाव्या, अशी मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टिका केली आहे. ईव्हीएमवर प्रश्न विचारणे ही विरोधी पक्षाची दिवाळखोरी आहे. विरोधी पक्ष जर निवडणुकीत विजयी झाला तर ईव्हीएम चांगले आणि पराभव झाल्यास ईव्हीएम वाईट, असे त्यांनी स्पष्ठ केले.