लाखणगांव -कांद्याला बाजारभाव नसल्याने काठापूर (ता. आंबेगाव) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा वखारीमध्ये साठवणे सुरू केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने कांद्याचे बाजारभाव गडगडले आहेत. सध्याच्या बाजारभावात कांदा विकणे परवडत नसल्याने ताबडतोब कांदे विकणारे शेतकरी कांदाचाळी बनवत आहेत.
कांदाचाळी उभारण्यासाठी 100 पिशवीच्या चाळीसाठी 20 हजार खर्च येतो. शेतकरी 300 ते 400 पिशव्यांची कांदाचाळ 60 ते 80 हजार रुपये खर्च करून उभारत आहे. सरकारच्या वतीने कांदा चाळ अनुदान मिळते; परंतु अनुदानाकडे न पाहता शेतकरी गुंतवणूक करून कांदाचाळी उभारत आहेत.