नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे प्रशासन प्रतिबंधक उपाययोजना करीत असून, नियम न पाळण्यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने कार्यालयात मास्क न वापरणार्या कर्मचार्यांना एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठविला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यात करोनाची लाट निवळली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात करोनाने पुन्हा मुसंडी मारली असून, दररोज सुमारे सरासरी अडीचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात नगर शहरात सर्वाधिक अॅटिव्ह रुग्ण असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासानाने प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मास्क हीच लस असल्याने मास्क वापरणे अनिर्वाय केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मास्क न वापरणार्या प्रत्येक नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारणे सुरू आहे. तसेच, लग्न, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमावरही मर्यादा आणल्या आहेत. तरी ही करोना आटोक्यात येताना दिसत नाही.
दरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबर 2020 मध्ये जिल्हा परिषदेमध्ये करोना बाधीत कर्मचार्यांचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेमध्ये करोना प्रतिबंधक उपायोजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्या नियमांची पायमल्ली होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचार्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तरी ही काही कर्मचारी विना मास्क कार्यालयात फिरतात. त्यामुळे विना मास्क कार्यालयात फिरणार्या कर्मचार्यांसाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकार्यांकडे मजुरीसाठी पाठविला आहे.
जिल्हा परिषद कर्मचार्यांनी मास्क वावरणे बंधनकारक आहे. मात्र, त्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाईच्या मंजुरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविला आहे.
वासुदेव साळुंके
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.