शंकर दुपारगुडे (प्रतिनिधी कोपरगाव ) – जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. चिंतेने व्याकूळ झालेल्या भारतावर कोरोनाचे हे मोठे संकट आहे. या संकटाला सर्वांनी देश सेवा समजून प्रशासनाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सहकार्य करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरात बसून आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी ध्यान करावे. रविवारी विनाकारण घराबाहेर जावून गर्दीत फिरू नये. संसर्गजन्य रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आत्मचिंतन, ध्यान धारणा करून आत्मबल वाढवणे गरजेआहे . एक दिवस घरात बसणे म्हणजे देशसेवा करण्याची सर्वांना मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. स्वताःसह इतरांचे रक्षण करून या रोगराई वातावरणावर मात करता येते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना घराबाहेर कोणीही जावू नये या आवहानाला प्रतिसाद देऊन खरी देशसेवा करावी असे कळकळीचे आवाहन कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकठाण ध्यानपिठाचे प्रमुख ओमगुरूदेव माऊलींनी भक्तपरिवारासह तमाम नागरिकांना केले आहे. या संदर्भात अधिक माहिती.
दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून आत्मामालीक ध्यानपिठाचे सर्व आश्रम, शैक्षणिक संस्थांचे दैनदिन कामकाज, दर्शन, सत्संग, आदी सर्व सोहळे बंद केले आहेत. भाविकांनी आपल्या घरी बसुन ध्यान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वैष्विक आपत्तीसाठी विश्वात्मक आत्म्याचे ध्यान हाच रामबाण उपाय…!
आधुनिक जीवन शैलीला लागलेल्या कोरोना नावाच्या भयानक रोगाला आज आपण हरवू शकतो का? याचे उत्तर आहे होय. वैष्विक व राष्ट्रीय स्तरावरून शासन, प्रशासन आपले कार्य अतिशय गांभीर्याने व जबाबदारीने पार पाडत आहे. मात्र या सर्व प्रयत्नांना जोपर्यंत जनमाणसांचा पाठिंबा व सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत इच्छित परिणाम निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ मार्च रोजी आपआपल्या निवासस्थानी बंधीस्त राहण्याचे आवाहन समस्त भारतीय नागरिकांना केले आहे. ही संचार बंदी म्हणजे जनतेने जनतेसाठी स्वयंमशासित पध्दतीने अंगीकारलेली जगातील पहिली व अभिनव जीवन पध्दती असेल. ही अनुशासीत पध्दत पाळला जाणारा नियम प्रत्येक माणसाला स्वत:च्या ठायी स्थीर करणारा अभ्यास असेल. यामध्ये प्रत्येक भारतीय नागरीक आज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आपल्या वास्तव्याच्या ठिकाणीच राहने अपेक्षित आहे.
रविवारी १४ तासातील काही तास जर ध्यान साधनेसाठी म्हणजेच आत्मचिंतनासाठी प्रत्येकांनी व्यतीत केले तर, निश्चितच याचा परिणाम आपण स्वस्थ आणि स्थिर होऊन स्वत:ला व आपल्या कुटुंबीयांना आणि संपुर्ण भारतासहीत अखिल मानव जातीला वाचवण्यासाठी मदत होईल यात तीळ मात्र शंका नाही. आपण सर्वांचे ठायी प्रचंड मोठ्या प्रमाणात असिमित अशा आत्मशक्तीचा स्त्रोत आहे. याच आत्मशक्तीच्या आधारावरती आपण जीवन जगत आहोत. हिच आत्मशक्ती विश्वातील चराचर जीवाच्या हदयस्थ विराजीत आहे. म्हणून या आत्मशक्तीचे ध्यान चिंतन केल्यास प्राप्त होणारी सकारात्मक वैश्विक आत्मीक ऊर्जा शक्तीमुळे एक पवित्र शुध्द व चैतन्यपूर्ण लहरी वातावरणामध्ये निर्माण होतील. याच ध्यानाच्या माध्यमातून या वैश्विक शक्तीचे म्हणजेच परमात्म्याची प्रार्थना केल्यास कोरोनासारख्या या महामारीतून विश्वाची मुक्तता होईल व सर्वत्र प्रफुल्लीत सचेतना निर्माण होईल.
ध्यान म्हणजेच आत्म चिंतन करावे. ध्यानाला बसल्यावर प्रथम पाच वेळेला ॐ काराचा उच्चार करून मग ५ ते ७ मिनिटे प्राणायामाचा अभ्यास करावा. प्राणायामामुळे श्वासोच्छाद्वारे घेतलेल्या प्राणशक्तीचा विकास होतो व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ध्यान व प्राणायम हे मनाचे व शरिराचे आरोग्य सुदृढ करणारी शास्त्रोक्त अभ्यास पध्दती आहे. ध्यानामुळे आपली कार्यक्षमता वाढून सर्वोतोपरी नकारात्मक शक्ती नाहीशी होते व सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होऊन रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढवून माणूस सर्वांगिण सक्षम बनतो. आत्मचिंतन ध्यानामुळे आत्मबल वाढते. या आत्मबलामुळे आपल्या सर्व व्याधी नष्ठ होतात व निरोगी सदृढ आनंददायी जीवन जगता येते. मात्र यासाठी मनुष्याने मांसाहार पूर्णतः वर्ज्य करुन शाकाहार घेणे आवश्यक आहे. निर्सग ज्या पध्दतीने संकटे निर्माण करतो त्यावरील सर्व पर्याय व उपाय तो आपल्या आतमध्ये आधीच निर्माण करत असतो. मानवी जिवनाला या विघातक असणार्या सर्व गोष्ठींना नष्ट करणारी एक विश्वात्मक शक्ती आपणा सर्वांचे हदयस्त विराजीत आहे त्या आत्मशक्तीचे चिंतन ध्यान करून आपण कोरोनासारख्या विषाणूंचा प्रतिकार करण्यास सक्षम होऊया.
आत्मा मालिक ध्यानपीठाचे वतीने श्रीमान पंतप्रधान मोहोदयांनी घोषित केलेल्या 14 तासातील खालील नमुद केलेल्या वेळेला प्रत्येक मनुष्याने ध्यान साधनेसाठी आपआपल्या ठिकाणी ध्यानस्त व्हावे ही विनंती. ध्यान साधनेची वेळ :- सकाळी 8:30 ते 9:30, दुपारी 12 ते 1 व सायं. 6 ते 7 अशी निश्चित करावी. सायं. 5 वा घंटानाद, शंखनाद करून किंवा टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी.
वर नमूद केलेल्या वेळेला समस्त भारतासह विश्वामध्ये जर एकाच वेळेला आत्मचिंतन अर्थात ध्यान घडले तर, निश्चितच या वैश्विक ध्यानातून या जागतीक महामारीला प्रतिबंध लागेल. व मानवी जिवन कोरोनामुक्त होण्यास आपले अनमोल योगदान लाभेल.