पुणे –जुलैमध्ये काही भागांतच बरसलेल्या पावसाने आता काहीशी चिंता निर्माण केली आहे. मागील आठ-दहा दिवसांत राज्यात कोठेही मोठा पाऊस झालेला नाही. तर, आता दि. 20 ऑगस्टनंतरच पाऊस सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात “मान्सून ब्रेक’ सुरू आहे. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, सध्या राज्याच्या घाट क्षेत्र किंवा कोणत्याही भागात मुसळधार पाऊस पडत नाही. मान्सूनच्या पश्चिमेकडील वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. शिवाय संपूर्ण कोकण, घाट भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या बहुतांश भागांत कोठेही गेल्या काही दिवसांत दमदार पाऊस झालेला नाही. तर, पुण्यातदेखील दि. 20 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे हा मान्सून ब्रेक पावसाची प्रतीक्षा करायला लावणार आहे.’
दरम्यान, दुसऱ्या बाजूला राज्याच्या काही भागांत दि. 20 ऑगस्टनंतर पावसात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु योग्य आणि मुसळधार पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभावमध्य भारतावरील मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेकडे सरकला आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचे प्रमाण घटले आहे. मेडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्रही प्रतिकूल स्थितीत आहे. त्यामुळे पावसात हा खंड निर्माण झाला आहे. शिवाय, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या अभावामुळे ऑगस्टमध्ये सर्वसाधारणपणे मान्सून ब्रेक स्थिती निर्माण होत असते, असे निरीक्षण हवामान शास्त्र अभ्यासकांनी नोंदवले आहे.
मध्य भारतावरील मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा उत्तरेकडे सरकला आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचे प्रमाण घटले आहे. मेडन ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्रही प्रतिकूल स्थितीत आहे. त्यामुळे पावसात हा खंड निर्माण झाला आहे. शिवाय, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याच्या अभावामुळे ऑगस्टमध्ये सर्वसाधारणपणे मान्सून ब्रेक स्थिती निर्माण होत असते, असे निरीक्षण हवामान शास्त्र अभ्यासकांनी नोंदवले आहे.