जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चीनमध्ये कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांनी केंद्र सरकारला त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.
गहलोत यांनी या संबंधातील एका ट्विटर संदेशात म्हटले आहे की, जगभरात कोविडची प्रकरणे कमी होत असताना चीनमध्ये कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी तिथून विषाणूचा उदय झाल्यामुळे चीनमधील प्रकरणांमध्ये झालेली वाढ भारतासाठी चिंताजनक आहे, केंद्र सरकारने याची वेळीच दखल घ्यायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.
मागील तीन कोविड लाटेपासून धडा घेऊन सरकारने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांच्या हालचालींवरही निर्बंध घातले पाहिजेत. आणि तेथील परिस्थिती पाहून योग्य ती उपाययोजना आतापासूनच हाती घेतली पाहिजे, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.