मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 40 आणि उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेच्या कारवाईच्या संबंधात नोटीसा बजावल्या आहेत. यावर त्यांना पुढील सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणी विधानसभेच्या अध्यक्षांनीच निर्णय घेतला पाहिजे अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे अध्यक्षांनी आता ही प्रक्रिया पुढे न्यायचे ठरवले आहे.
त्यानुसार या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. मात्र शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, त्यांना राज्य विधिमंडळाकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही.
दरम्यान नार्वेकर यांच्यावर हल्ला करताना, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत म्हणाले, “स्पीकरने गेल्या दोन महिन्यांत (अपात्रतेच्या याचिकेवर) काहीही केले नाही, म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना नोटीस बजावण्यास आणि उत्तर मागवण्यास सांगितले असे त्यांनी नमूद केले.