पाटणा – नितीशकुमारांच्या जनता दलाने आज बिहारसोडून देशातील इतर सर्व राज्यांमधून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून त्याचबरोबर देशातील जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनता दल युनायटेड स्वबळावर लढणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षांच्या वाट्याला प्रत्येकी एक मंत्रिपद देण्याचा निर्णय भाजपतर्फे घेण्यात आला होता. बिहारचे मुख्यमंत्री तथा जनता दल युनायडटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी भाजपतर्फे देण्यात आलेल्या एका मंत्रिपदाला ‘प्रातिनिधिक’ ठरवत मंत्रिपद घेण्यास नकार दर्शविला होता.
अशातच आता जनता दलातर्फे बिहारसोडून इतर सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याने भाजप व जेडीयूमधील खडखड चव्हाट्यावर आली आहे.
Janata Dal United (JDU) will not be a part of National Democratic Alliance (NDA) outside the state of Bihar. JDU will fight the upcoming elections alone in J&K, Jharkhand, Haryana & Delhi. The decision has been taken in the party's National Executive Meet today. pic.twitter.com/LfwMgZs2l3
— ANI (@ANI) June 9, 2019