नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांबरोबर अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीला गोवा, हरियाणा आणि पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, बिहार, दिल्ली, तामिळनाडू आणि त्रिपुराचे उपमुख्यमंत्री तसेच 17 राज्यांचे अर्थमंत्री/मंत्री आणि केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी अर्थमंत्र्यांनी सहकारी संघवादाचे केंद्र सरकारचे तत्वज्ञान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्य सरकारांनी मते आणि सूचना सादर करण्याची संधी मिळाल्याचे स्वागत केले. त्यांनी विकास, गुंतवणूक, संसाधन विषयक गरजा आणि वित्तीय धोरणाबाबत सूचना केल्या. या सूचनांवर विचार करण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.