न्हावरे – शालेय जीवनात गुरूजनांच्या आदर्श संस्कारामुळेच जीवनाला दिशा मिळत असते. त्यामुळे मोठेपणी प्रत्येकाने शाळेचे व गुरूजनांचे उपकार विसरू नका असे आवाहन राज्याचे महसूल, पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी केले.
न्हावरे (शिरुर) येथील श्री. मल्लिकार्जुन विद्यालयात सन-1987 -88 मध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्या निमित्त तब्बल 33 वर्षांनंतर वर्ग भरला होता. या मेळाव्यात किशोरराजे निंबाळकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य पी.के.वाणी होते.
दरम्यान, दिवंगत शिक्षक विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर एकमेकांची विचारपूस करत शालेय जीवनातील आठवणींना उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला व पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सेवानिवृत्त जिल्हा शिक्षणाधिकारी बजरंग आवारी, माजी प्राचार्य भगवान मोरे, मधुकर खोपडे, रामचंद्र पंडित, राजधर पोळ, विलास भोंडवे, ग्रामसेवक संघटनेचे राजेंद सात्रस, सामाजिक कार्यकर्ते दिपक खंडागळे , माजी सैनिक सुखदेव डांगे, विदयानंद मानकर,रायबा बोरकर, शर्मिला धुमाळ, सुवार्ता गवई, राजेंद्र गायकवाड, उमेश भिवरे, सुरेश कोरेकर, संजय गायकवाड, बाळासाहेब मदने, माणिक झराड, विजय बेनके, अर्जुन होजगे, बाबूराव वाघमोडे, राजेंद्र गारगोटे, शामराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी प्राचार्य सुभाष देशमुख, तुकाराम गिरमकर, माणिकराव मानकर, रामदास शेळके, आदी. मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र सात्रस, दिपक खंडागळे, बाळासाहेब मदने, बाळासाहेब वेताळ, संजय गायकवाड यांनी पुढाकार घेतला होता. सुत्रसंचालन विजय बेनके यांनी केले.