पुणे, खडकवासला धरणातून कालव्यातून सोडले जाणारे पाण्याचे बाष्पीभवन गळती, चोरी आर्दीमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणारा कचरा यामुळे पाणी प्रदूषित होते. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी या ३५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बोगद्यामधून पाणी नेण्याच्या योजनेमुळे सध्या असलेले कालव्याचे अंतर दहा किलोमीटरने कमी होणार आहे. हा बोगदा २५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वर्षाला अडीच टीएमसी पाणी बचत आहे.
खडकवासला धरण ते फुरसुंगी केले आहे. त्यासाठी सविस्तर हा कालवा बंद करून त्याऐवजी भूमिगत बोगद्यातून पाणी पुरवठा करावा, त्यासाठी सुमारे १ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्यालगत असलेली सुमारे दोन हजार हेक्टर जागा आहे. त्याचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्यास त्यातून मोठा निधी उभा राहू शकतो. या निधीतून बोगद्यासाठी येणारा खर्च करावा, असा विचार मध्यंतरी पुढे आला होता. त्यासाठी या जागेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पीएमआरडीएने करावा, असे जलसंपदा विभागाने पीएमआरडीएला कळविले होते. तसे केल्यास बाप्पीभवन आणि गळतीमुळे होणारा पाण्याची नासाडी भरून निघण्यास मदत होईल. त्यातून सुमारे अडीच टीएमसी पाणी वर्षभरामध्ये वाचणार आहे. मात्र, पीएमआरडीएने त्यास नकार दिला होता. त्यामुळे आता खुद्द जलसंपदा विभागानेच हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.