मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी करोनावर मात केली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या (रविवारी) सकाळी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी “गो कोरोना’चा नारा दिला होता. मात्र “गो करोना’चा नारा देणाऱ्या रामदास आठवले यांनाच करोनाने गाठले होते. दि. 27 ऑक्टोबर रोजी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हापासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते.
11 दिवस उपचारानंतर रामदास आठवले यांनी करोनावर मात केली आहे. बांद्रा येथील “संविधान’ या त्यांच्या निवासस्थानी ते उद्या परतणार आहेत.