बारामती – मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठीची आरक्षणाची लढाई सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.
इतकं निष्टुर सरकार कधी पाहिलं नाही. आरक्षण कसे देत नाही ते बघूच.. असा इशारा मनोज जरांगे यांनी बारामती येथून सरकारला दिला. आरक्षणाचा लढा जिंकल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर झंझावात सुरू ठेवला आहे. आज बारामती येथे शहरातील तीन हत्ती चौकात आयोजित सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले मराठा समाजासोबत गद्दारी करू शकत नाही.
आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी लढाई सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवायचा आहे.अशी संधी पुन्हा येणार नाही. कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हरकत कशाला असा सवाल जरांगे यांनी नारायण राणे यांना केला.
मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. आरक्षणाला विरोध केला तर सोडणार नाही, आरक्षणाचा लढा आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आहे. ही लढाई गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. ज्यांना गरज नाही त्यांनी मराठा आरक्षण घेऊ नये. आरक्षणाची लढाई आपण जिंकायचीच असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये. मराठा समाजाचा लढा शांततेत सुरू आहे. मराठा समाजाने कधीही जात पाहिली नाही. 24 तारखेला सरकारचे 40 दिवस संपत आहेत तोपर्यंत शांत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
हैदराबादला 5 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठ्यांवर फार अन्याय झाला आहे. आरक्षणाचे मुद्द्यावर सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. आमच्या पूर्वजांनी अनेकांना मोठे केले. गाफील राहू नका, ताकतीने तयारी सुरू करा, आरक्षणाचे महत्व घराघरात पोहोचवा, असा संदेश जारांगे यांनी दिला.