मुंबई – राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून रुग्णसंख्या झपाटयाने कमी होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात करोनाच्या 973 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासात 2 हजार 521 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज 22 महापालिकांमध्ये करोनाचा एकही मृत्यू, तर तीन महापालिकांमध्ये करोनाचा एकही रुग्ण सापडला झालेला नाही.
राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4629 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4456 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 173 ओमायक्रॉनचे रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 7 हजार 254 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईन, तर 746 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.