नवी दिल्ली – युमना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीतील स्थिती अत्यंत भीषण झाली असून तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही अनेक ठिकाणचा भाग जलमय आहे. शनिवारी आणि रविवारीही दिल्लीत पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा दिल्लीत केंद्र सरकार व राज्य सरकारांनी एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू केले आहे.
कालपासून भाजपने केजरीवालांच्या विरोधात आंदोलनही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी म्हटले आहे की, कालपासून भाजपच्या लोकांनी मला शिव्या देणे सुरू केले आहे. पण त्याने मला काही फरक पडत नाही. दिल्लतील आजच्या स्थितीबाबत एकमेकांकडे असे बोट दाखवून परस्परांना जबाबदार धरण्याने काहीही साध्य होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.आजची गरज माणसाने माणसाला मदत करण्याची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान गेले काहीं दिवस सतत धोक्याच्या खुणेच्या वरून वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्याची पातळी आज किंचीत कमी झाली आहे. तथापि अजूनही ती 207 मिटरच्यावरूनच वाहात आहे. यमुनेची धोक्याची पातळी 205 मीटर इतकी आहे. चंद्रवाल आणि वझिराबाद येथील पाणी शुद्धीकरण केंद्रे पुरामुळे बंद करण्यात आली होती. पण आता ती सुरू करण्यात आली आहेत. आज केजरीवालांनी ओखला वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट पुन्हा सुरू केला.