मुंबई – लोअर परळमधील डेलिसल रोड ब्रिजचे बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याबद्दल ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर त्या संबंधात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे सरकारचे बेकायदेशीर आणि अनैतिक आहे असे म्हटले आहे.
जे स्वतः बेकायदेशीर आणि अनैतिक आहेत ते दुसऱ्यांना कसे बेकायदेशीर घोषित करत आहेत? असा सवाल करीत त्यांनी हा हास्यास्पद प्रकार आहे असे म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की माझ्या ट्विटमुळे त्यांनी मेट्रो जनतेसाठी खुली.
ते म्हणाले की सदर पुल माझ्या मतदार संघात आहे आणि तो पुर्ण होऊनही केवळ उद्घाटनासाठी रोखून धरण्यात आला होता. त्यामुळे पुलाची पहाणी करून तो सुरू करणे माझ्या अधिकारात नाही का असा सवालही त्यांनी केला. तरीही जर ते माझ्यावर गुन्हा दाखल करत असतील तर मी त्यासाठी तयार आहे. हे जनतेसाठी आहे, मी लोकांसाठी लढत राहीन.असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी सेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही या प्रकरणी शिंदे सरकारवर टीका केली, त्या म्हणाल्या की, बेकायदेशीर आणि भ्रष्ट सरकारने खूप आधी या पुलाचे उद्घाटन करायला हवे होते. पण त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पुलाला आधीच खूप विलंब झाला आहे आता तो उद्घाटनासाठी प्रलंबीत ठेवण्यात आला होता त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होत होती असेही त्यांनी म्हटले आहे.