Growth Rate| – सन 2047 पर्यंत भारताला खरोखरच विकसित देश व्हायचे असेल तर आगामी काळामध्ये भारताचा विकास दर साधारणपणे आठ टक्के इतका राहण्याची गरज आहे, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी सांगितले. एवढा विकासदर साध्य केला तर भारताचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 13 हजार डॉलर होऊ शकते असे ते म्हणाले.
सध्या भारताचे दरडोई उत्पन्न केवळ 2,700 डॉलर आहे. जर पुढील वीस वर्षे भारताने विकासदर आठ टक्के इतका ठेवला तरच भारताचे दरडोई उत्पन्न 13,000 डॉलरपर्यंत वाढू शकते.
सध्याच्या व्याख्येनुसार ज्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न 13,000 डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा देशाला विकसित देश समजले जाते. केवळ देशाचे उत्पन्न वाढून उपयोग नाही त्यासाठी सर्व समावेशक विकास विकासाकडे जास्तच लक्ष दिले पाहिजे. कारण भारतात गरिबाची संख्या जास्त आहे असे त्यांनी सांगितले.