नवी दिल्ली – जागतिक बाजारात कमालीची नकारात्मक परिस्थिती असताना भारताचा विकासदर 7% पेक्षा जास्त आहे. हा विकासदर पुरेसा आहे, असे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव संन्याल यानी म्हटले आहे. जर जागतिक परिस्थिती सुधारली तर भारताला आपला विकासदर सध्याच्या विकासदरापेक्षा वाढवावा लागेल असे त्यांनी नमूद केले. (India’s current growth rate is adequate; Opinion of Sanjeev Sanyal, Member of PM Modi’s Economic Advisory Council)
तिसर्या तिमाहित भारताचा विकास दर 8.4% भरला आहे. ही बाब खरोखरच प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारने करोनाच्या काळातही आर्थिक शिस्त सोडली नाही. त्यामुळे आपली स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. या कारणामुळे भारताचा विकास दर इतर देशातील विकासदरापेक्षा जास्त आहे आणि हा सध्याच्या परिस्थितीत विकासदर पुरेसा असल्याचे त्यांनी नमूद केले.