मुंबई – मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीकडून या प्रकरणाशी भाजप कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काँग्रेसकडूनही भाजप आणि एनसीबी यांच्यातील संगनमताची चौकशी कऱण्याची मागणी करण्यात आली आहे.
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, हे एनसीबीनेच स्पष्ट केलं. मग तो व्यक्ती कोण असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
सावंत यांनी NCB आणि भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे ? कोणत्या अधिकाराने ? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात ? यांच्या गाडीवर “पोलीस” पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
NCB व भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर “पोलीस” पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का? pic.twitter.com/riyLPZKiQQ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 6, 2021
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील पुराव्यांसह भाजप आणि एनसीबी यांच्या कनेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.