जामखेड (प्रतिनिधी) | तालुक्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत देण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील काही दिवसांपासून जामखेड तालुक्यातील व परिसरामधील गावांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे सोयाबीन व कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असून हातात आलेले पीक पाण्यात गेले आहे.
या नुकसानीची दखल घेत भारतीय जनता पार्टी जामखेड तालुका वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे व हेक्टरी 25 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व शेतकरी वर्ग यांच्या वतीने तहसील समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी रवी सुरवसे,भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले. पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरुमकर,जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरने, प्रविन चोरडीया,प्रविन सानप, आशोक महारनवर,उदयसिंह पवार,गोरख घनवट,मनोज कुलकणीं,मोहन गडदे, शिवकुमार डोंगरे सोमनाथ राळेभात,नगरसेवक आमित चिंतामनी, दादाबापु वारे पांडुरंग उबाळे,डाॅ गणेश जगताप, आर्जुन म्हेत्रे,बाजीराव गोपाळघरे, तुषार बोथरा आदी उपस्थित होते.