चंदिगड – नरेंद्र मोदी सरकार केवळ जाहिरातींमध्ये दिसत असल्याची टीका आज कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली. भाजप आणि आप दोन्ही पक्ष राजकीय लाभासाठी जनतेच्या भावना आणि धर्माचा उपयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशामध्ये कोणतेही सरकार अस्तित्वात नाही. जर देशात सरकार अस्तित्वात असते, तर बेरोजगारी आणि महागाईही नसती. सरकारी मालकीच्या कंपन्यांमधून रोजगार निर्मिती झाली असती. या कंपन्या आपल्याच मित्रांना विकाव्या लागल्या नसत्या, असेही त्या म्हणाल्या.
देशातील छोटे व्यापारी, गरीब लोक आणि लघु उद्योजकांसमोर अनेक अडचणी आहेत. मात्र त्याबद्दल कोणाला चिंता आहे, असे म्हणून प्रियंकांनी केंद्रावर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल हे पंजाबीयत बद्दल बोलत आहेत. हे हास्यास्पद आहे. पंजाबीयत समजण्यासाठी पंजाबमध्ये रहायला पाहिजे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.