Narayan Rane on Uddhav Thackeray – नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील वैर महाराष्ट्राला नवे नाही. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आणि टीका करताना शब्दांचीही तमा बाळगत नाहीत. याचीच प्रचिती नारायण राणे यांच्या भांडुप येथील कोकण महोत्सवातील वक्तव्यांवरून आली. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे – फडणवीस सरकारवर शिवसेनेकडून (ठाकरे गट) ‘खोके सरकार’ अशी टीका करण्यात येत आहे. यावरून निशाणा साधताना नारायण राणे यांनी थेट मातोश्रीला टार्गेट करत गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना रडणारी नव्हे, लढणारी…
“आज शिवसेनेची काय अवस्था झाली हो. सेनेचे ४० आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेसोबत निघून जातात. शिवसैनिक उघड्या डोळ्याने पाहत बसले. उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात. शिवसेना रडणारी कधीच नव्हती. त्याला शिवसेना नाही म्हणत. शिवसेना ही लढणारी होती. आता कुठे गेलं तुमचं सळसळतं रक्त? दोन्ही हात सावरुन घोषणा देत होतात, आता कुठे गेल्या तुमच्या घोषणा.” असा सवाल राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
त्यादिवशी मी जाहीर करेल की मातोश्रीच्या माळ्यावर काय काय पोहोचवलं…
“तुम्ही दुसऱ्यांना खोके म्हणतात. तुम्ही खोके नाही घेतले का? आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? उद्धव ठाकरे सांगेल त्यादिवशी मी जाहीर करेल की मातोश्रीच्या माळ्यावर काय काय पोहोचवलं ते.” असं थेट चॅलेंजचं राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
अडीच वर्ष उद्धव ठाकरे आयते सत्तेवर बसले | Narayan Rane on Uddhav Thackeray
यावेळी संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “आम्हाला बोलायला लावू नका. वयाच्या १५ व्या वर्षांपासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांच्या प्रेमासाठी आम्ही वेडे होतो. आम्ही जीवाची पर्वा न करता काम केलं. आता तुमच्याकडे असलेल्या नेते म्हणजे, संपादकाचा पण पगार घेतात, नेता म्हणून तोडबाजी पण करायची? असे काम मी केले नाही. आम्ही शिवसेनेसाठी त्याग केला. उद्धव ठाकरे आयते सत्तेवर अडीच वर्ष बसले.”