जळगाव : पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही, अशी टीका केलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.
नारायण राणे प्रसिद्धीसाठी बोलतात त्यांनी जर असे काही बोलले नाही तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देणार नाही, असा चिमटा घेत गुलाबराव पाटील म्हणाले, राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी काहीच बोलूच नये.