पाथर्डी – श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेस सोमवार (दि. 6) पासून सुरुवात होत आहे. 15 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. सकाळी 9 वाजता कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटवून तर सायंकाळी गोपाळ समाजाची होळी पेटवल्यानंतर मढी यात्रेस प्रारंभ होणार आहे. गोपाळ समाजाचा दोन गटांचा वाद लक्षात घेता होळी पेटविण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
मढी यात्रेस दि.6 मार्च रोजी प्रारंभ होऊन रंगपंचमी यात्रेचा मुख्य दिवस आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा भरते. दोन वर्ष करोना महामारीमुळे यात्रा भरली नाही. यंदा मात्र मढी यात्रा जोमाने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासन वगळता इतर विभागाकडून यात्रेची कुठलीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाही.
पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी बैठक झाल्यानंतर वेळोवेळी पाहणी करून पोलीस विभागाकडून वाहनतळ रस्ते व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे.यात्रेनिमित्त विविध हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत. रहाटपाळणे, मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही सुरुवात झाली आहे.
गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासह विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन बारीत बॅरीकेटींग व मजबूत रेलिंग अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्य कानिफनाथ मंदिर व परिसरात सुशोभिकरण, दर्शन बारी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामाने वेग घेतला आहे. यात्रेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र अरोळे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समिती, सर्व विश्वस्त यासह सर्वच कर्मचारी विश्वस्त परिश्रम घेत आहेत. देवस्थान समितीने दि.18 ते 21 मार्च दरम्यान गुढी पाडव्यापूर्वी चार दिवस अगोदर कानिफनाथांचे समाधी मंदिर दर्शनाला खुले ठेऊन समाधी मंदिरात भाविकांना थेट प्रवेश मिळणार आहे.
मातीने बुजविले खड्डे –
नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत. जे खड्डे बुजवले तेचक्क मातीने बुजविल्याने खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने तत्काळ हे काम थांबवून डांबराने पॅचवर्कचे काम करावे, अशी मागणी होत आहे. तिसगाव- मढी नवीन झालेल्या