नगर – कॉंग्रेस केवळ पक्ष नव्हे तर ती एक स्वातंत्र्य देणारी आणि स्वराज्याकडे वाटचाल करणारी चळवळ आहे. आजच्या कठीण परिस्थितीत ही चळवळच देशाला न्याय देऊ शकेल, असा विश्वास कॅप्टन पी.जी.चौधरी यांनी व्यक्त केला. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अहमदनगर शहर कॉंग्रेस व भिंगार कॉंग्रेसच्या संयुक्त कार्यक्रम येथील भुईकोट किल्ल्यातील नेताजी कक्षामध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कॅप्टन चौधरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल काशिद होते. भारतात काश्मीरचे विलिनीकरण प्रसंगी पं.नेहरु यांचे मोठे योगदान आहे. आज परिस्थिती वेगळी आहे, पण खरा इतिहास लोकांसमोर ठेवला पाहिजे, असेही कॅ.चौधरी म्हणाले, तर अध्यक्षीय भाषणात कर्नल काशिद यांनी स्वातत्रोत्तर काळात लष्कराने बजावलेली कामगिरीचा गौरव केला. या देशाला कॉंग्रेस पक्ष दिशा देत आला आहे. त्या मार्गावरुन सध्याचे सरकारने पुढे जावे, असे आवाहन केले.
प्रारंभी आयोजक शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी स्वागतपर भाषणात 9 ऑगस्ट क्रांतीदिनाची माहिती दिली तर प्रास्तविकात भिंगार कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड.रामकृष्ण पिल्ले यांनी देशाला स्वातंत्र्य देणारी 9 ऑगस्ट क्रांतीदिन म.गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय झाली, त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्ती झाली तर पं.नेहरु यांनी भारताला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम केले ही ती कॉंग्रेस चळवळ आहे.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, ऍड.साहेबराव चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी, अल्पसंख्याक अध्यक्ष फिरोज खान आदिंची समयोचित भाषणे झाली. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राज्यातील पुरात मृत झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर बहारदार कवी संमेलन झाले. कवी संमेलनात प्रारंभी कवी विवेक येवले यांनी राष्ट्रभक्तीपर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. यानंतर विविध विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या. सर्वश्री ज्येष्ठ नेते प्रेमसुख लोढा,उपाध्यक्ष शशिकांत पवार, सरचिटणीस अभिजित कांबळे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, जिल्हा युवक सरचिटणीस मोबिन शेख, उपाध्यक्ष आर.आर.पाटील, स्वा.सै.ग्यानमल गांधी, ऍड. नरेंद्र भिंगारदिवे, अनिल वराडे, निजाम पठाण, राजेश बाठिया, सुनिल उल्हारे, संतोष धीवर, आदि उपस्थित होते. शेवटी प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर यांनी आभार मानले.