पुणे – मान्सून अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस अजूनही केरळच्या सीमेवरच थबकला आहे. पण, येत्या 48 ते 72 तासांत तो कधीही केरळमध्ये एन्ट्री घेऊ शकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पण, यामुळे देशभरातील पावसाची वाटचाल
4 दिवस पुढे गेली आहे.
4 दिवस मागे अथवा पुढे
मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. त्याचवेळी त्या वाटचालीत 4 दिवस मागे अथवा पुढे असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. आता नव्या अंदाजानुसार दि.1 जूनपर्यंत मान्सून कधीही केरळमध्ये पोहोचू शकतो. या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
आता अनुकूल परिस्थिती
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील
48 तासांत अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्वीप भागांत मान्सून आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
“असनी’चा प्रभाव
केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तत्पूर्वी “असनी’ वादळामुळे मध्य आणि पूर्व भारतात अपेक्षित असलेला मान्सूनपूर्व पाऊसही झाला नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
अन्य राज्यांत मान्सून कधी पोहचतो?
आता ताज्या माहितीनुसार मान्सून केरळमध्ये आल्यानंतर देशभरात त्याचा पुढील प्रवास सुरू होतो. त्यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात तो आंध्र प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी आणि आसाममध्ये धडकतो. त्यानंतर गोवा-महाराष्ट्रात प्रवेश करतो. त्यानंतर तो झारखंड, बिहारकडे आगेकूच करून छत्तीसगढ, उत्तरप्रदेश आदी राज्यांत जातो.