नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा मुद्दा वर्षभरानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षांनीउचलून धरला आहे. भारत आणि चीन संघर्ष तसेच सीमावादावरून सातत्याने मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी निशाणा साधत असतात. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा टीका केली असून, चीनला सडेतोड प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले आहे.
चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, ते चिनी नागरिक असल्याचा दावा करणारे वृत्त ग्लोबल टाईम्स या चीनच्या माध्यमाने दिले आहे. याचाच सांदभ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
गलवान पर हमारा तिरंगा ही अच्छा लगता है।
चीन को जवाब देना होगा।
मोदी जी, चुप्पी तोड़ो!— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 2, 2022
“गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावे चिनी ठेवल्याचे वृत्त शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण १९७१ मधील गौरवपूर्ण विजयाची ५ दशके साजरी केली. देशाची सुरक्षा आणि विजयासाठी कठोर निर्णयांची गरज असते, खोट्या जुमल्यांनी विजय मिळत नसतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
Hello @narendramodi @AmitShah.
"Laal-aankhein" rehne do, ek baar bolke toh dikha do ke "China ne Bharat ki zameen par kabza kiya hai".
Bhaashanon mein itni veerta jhaadne vaalon, ab chup kyun baithe ho?
2-4 App nahin ban karoge? 😆😱
56" ka seena "China ka maal" nikla? https://t.co/tS40SV5Xw9
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) January 2, 2022
दरम्यान, लडाख येथे झालेल्या चीन आणि भारतातील संघर्षावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडले. मनमोहन सिंह असते, तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र, भाजपवाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दावा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता.
काँग्रेसची लक्ष्मण रेषा सत्य आहे, तर भाजपची लक्ष्मण रेषा सत्ता आहे. हिंदुत्वाची विचारधारा मानणाऱ्या कुणाही समोर हे नतमस्तक होतात. यापूर्वी यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली आणि आता पैशांसमोर झुकले आहेत. यांच्या मनात सत्याची भावनाच नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.