ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारने ट्विटरला धमकावल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करण्यास आम्हाला सांगण्यात आले होते. असे केले नाही तरी कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करण्यात येईल अशी धमकी देण्यात आल्याचे डोर्सी यांनी दावा केला आहे. डोर्सी यांच्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे.
एका मुलाखतीदरम्यान डोर्सींना दडपण्याचा प्रयत्न कधी सरकारकडून झाला होता का? असा सवाल करण्यात आला होता. यात त्यांनी भारताचे नाव घेतले. ते म्हणाले की, “शेतकरी आंदोलना दरम्यान आम्हाला धमक्या देण्यात आल्या होत्या.काही पत्रकार हे सरकारवर टीका करत होते. मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करा. आम्ही असं केलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु आणि कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करु अशी धमकीच आम्हाला देण्यात आली होती.”
“एक प्रकारे आम्हाला हा इशाराच दिला गेला की आमचं ऐकलं नाही तर भारतात ट्विटर बंद करु. भारत ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ असल्याने आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. तसं केलं नसतं तर आमची कार्यालयं बंद करण्यात आली असती, तसंच कर्मचाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली असती. हे भारतासारख्या एका लोकशाही देशात घडले आहे.”
मात्र केंद्रीय मंत्र्याने डॉर्सी यांचा दावा ट्विट करत हा दावा फेटाळून लावला आहे. डॉर्सीच्या नेतृत्वाखाली ट्विटर आणि त्याची टीम सतत भारतीय नियमांचे उल्लंघन करत होते, असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हंटले आहे.
“This is an outright lie by Jack Dorsey – perhaps an attempt to brush out that very dubious period of twitters history. Twitter under Dorsey & his team were in repeated & continuous violations of Indian law. As a matter of fact, they were in non-compliance with law repeatedly… pic.twitter.com/UrvrYyvkqV
— ANI (@ANI) June 13, 2023
शेतकरी आंदोलन
भारत सरकारने देशात तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर शेतकऱ्यांकडून त्याचा विरोध सुरू झाला होता. साधारण वर्षभर हे आंदोलने सुरु होते. आंदोलनादरम्यान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. अखेर नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले.