मुंबई : विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी ठऱला असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमशा पाडवी, शिवसेनेचे सचिन अहिर आणि काँग्रेसचे भाई जगताप हे पाच उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना मात्र अपयशाला सामोरं जावं लागलं आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने चमत्कार घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे.
याआधी राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यानंतर विधान परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला निराशा आली आहे.