ज्ञानेश्वर फड/एम. डी. पाखरे
आळंदी –
होय होय वारकरी ।
पाहे पाहे रे पंढरी ।।
काय करावी साधने ।
फळ अवघेची येणे ।।
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी (दि. 22) पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी माऊलींना भावपूर्ण निरोप दिला. माऊलींना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. माऊली आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाल्याने अलंकापुरी सुनीसुनी वाटत आहे. दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे देहू फाटा, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, मॅकझिन चौक, दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी, पुणे आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच अनेकांकडून सोहळ्यातील
आज, उद्या पुण्यात मुक्कामी
माऊलींच्या पालखीचा मुक्काम बुधवारी (दि. 22) आणि गुरुवारी (दि. 23) पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ पुणे येथे असणार आहे. शुक्रवारी (दि. 24) पालखी सोहळ्यातील सर्वात कठीण प्रवास दिवे घाट पार करून सासवड मुक्कामी पोहोचेल. तर 9 जुलैला पालखी सोहळा तीर्थक्षेत्र पंढरपुरात पोहोचेल. 13 जुलैला माऊलींचा आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे.