राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – संख्येने माणूस मोठा होत नाही तर गुणवत्तेने मोठा होतो. बरेच पक्ष देशात मोठे आहेत; परंतु त्यांची गुणवत्ता संपलेली आहे, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष तथा राज्य सरकारच्या दिव्यांग विभाग अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, कृषी आदी क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणार्या राज्यातील मान्यवरांचा मुंबई येथे पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कडू बोलत होते. यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा. बी. एन. खरात, स्वागत अध्यक्ष बाळराजे शेळके, घाटकोपर विधानसभा अध्यक्ष सुधीर कांबळे, महिला अध्यक्षा मनीषा मोरे, अभिषेक मोहिते, गौतम साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्य्रक्रमांचे प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्ष घाटकोपर तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी तर सूत्रसंचालन सागर वाघमारे यांनी केले.
यांचा केला सत्कार
राजश्री फुलपगार, रामचंद्र सोनवणे, गौतम साळवे, डॉ. जोत्स्ना पवार, रमेश लवांडे, शिवराम हिरे, सखाराम डोंगरे, अशोक लांडगे, दीपक कांबळे, सुनील ताटे, तुकाराम भिवार.