कोलकाता :- भारताचा आक्रमक फलंदाज व स्टार क्रिकेटपटू मनोज तिवारी याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मनोज तिवारी सध्या बंगालच्या ममता सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहेत.
मनोज तिवारीला गेल्या 8 वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या मोसमात तो रणजी करंडक स्पर्धेत पश्चिम बंगालकडून खेळला होता. बंगाल संघ त्यावेळी रणजी मोसमाचा उपविजेता ठरला होता.
मनोज तिवारीने 2015 साली भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. त्याने 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत त्याने 287 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये त्याच्या नावावर केवळ 5 धावा आहेत.
मनोज तिवारी आयपीएल देखिल खेळला आहे. त्याची आयपीएलमधील कामगिरी सरस आहे. आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघांचाही तो भाग होता. यादरम्यान त्याने 98 सामन्यांत 1 हजार 695 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 7 अर्धशतकेही आहेत.